Authors *The_Happiest*

7 days 30 days All time Recent Popular
शेतकरी आंदोलन-शेतीपलीकडचे समज-गैरसमज..

"भारत हा कृषिप्रधान देश आहे" हे आमच्या भूगोल विषयात शिकवले आणि मुळातच भारत देशाची जडणघडण ही शेती आणि शेतीवर आधारित उद्योगांवर झालेली आहे, होत आहे आणि होत राहील यात तिळमात्र शंका नाही...

शेती हा इथला मूलभूत, जुना व्यवसाय असून तो टाकून देता येणार नाही आणि होणारी औद्योगिक, तांत्रिक, डिजिटल प्रगती आम्हाला पोटाला अन्न देऊ शकेल पण पोट भरू शकणार नाही, त्यासाठी शेती हाच पहिला आणि शेवटचा पर्याय होता, आहे आणि राहील..

ज्या ज्या वेळी शेती व्यवसायावर संकट आली त्या त्या वेळी त्या त्या वेळेच्या सरकारने / राजाने शेती व्यवसाय हाच भक्कम पाया मानून शेतकऱ्यांना शक्य ती मदत केली आहे..
.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरूंनी शेती आणि औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी नेहमी समतोल साधण्याचा प्रयत्न केला.

पुढे शास्त्री जी, इंदिरा जी यांनीही शक्य तितकी भरीव कामगिरी केली..
.
शेती करतांना तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्या नैसर्गिक आणि मानव निर्मित असून, त्या नवीन नाहीत मात्र सरकार हाच खरा शेतीचा आधारस्तंभ आहे, तारणहार आहे हे ज्या सरकारला कळले त्यांनी त्यांच्यासाठी काम केले..
.

सध्याच्या शेतकऱ्यांच्या आंदोलन संदर्भात अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत ते असे.
1. शेतकरी गरीब आहे, असतो, राहणार
2. गरीब शेतकरी अशिक्षित, अडाणी, गावठी असतो, आहे राहणार
3. शेतकरी सरकारला प्रश्न विचारू शकत नाही
4. शेतकऱ्याला काहीही कळत नाही.
5. शेतकरी टॅक्स भरत नाही
मोदि खरच चुकले का?
.
सद्या भक्त मंडळी सोडली तर सगळेच मोदी ला शिव्याशाप देत आहेत. कुठून अवदसा घरात घालून घेतली इथपर्यंत पश्चातापाची वेळ आली आहे.

महागाई
बेरोजगारी
दडपशाही कारवाई & कायदे
रोज रोज खोटं बोलणे
विरोधी लोकांवर
नेत्यांवर अनन्वित अत्याचार करणे
स्वतःचा उदो उदो करणे

इतरांना दोष देणे
सरकारी तिजोरीचा आणि जनतेकडून घेतलेल्या पैशांचा अपव्यय करणे
कोणताही हिशेब न देणे
काय करायचं ते करून घ्या अशी पोकळ धमकी देणे
कुणाचंही न ऐकणे
मनात येईल तेच करणे
सरकार दरबाराची कोणतीही अधिकृत आणि शासकीय माहीती लपवणे
पुरावे नष्ट करणे यातच मोदी स्वतःला धन्य मानतात.

हे सगळं करत असतांना, चालू असतांना,
करोडो शेतकरी कष्टकरी रस्त्यावर विरोधात उतरलेले असतांना
गरीब शेतकरी रस्त्यावर मरत असतांना,
कोरोना काळात लोकांचे हाल प्राण्यांपेक्षाही वाईट झाले असताना,

एखादा लोकशाही देशातला नेता एवढा हट्टी, खोटारडा, मठ्ठ, पाषाणहृदयी, मूर्ख, निर्लज्ज असू शकतो?

केवळ अंबानी अदानी त्यात सहभागी आहेत का?
मोदी एवढा बलाढ्य पहिलवान केव्हापासून झाला?
केवळ मोदी, शाह, अंबानी, अदानी, डोवल, योगी, गोदिमीडिया, टिनपाट अशिक्षित उर्मट भक्त यांना दोष देऊन चालणार आहे का?
तेवढ्याने प्रश्न सुटेल का?
जनतेला समाधान, शांती मिळेल का?
देशाची समृद्धी होईल का?

मोदी शाह जोडी लोकांचं, या देशातील लोकांचं, ज्यांनी निवडून दिले आहे त्यांचे ऐकून का घेत नाही?
मोदी शाह नेहमी त्यांना जे बोलायचं जे करायचं तेच बोलतात आणि करतात बाकीच्यांनी केवळ ऐकण्याचं आणि गुलामसारखं त्यांच्या मागेमागे चालायच, ब्र काढायचा नाही, विरोध करायचा नाही, असे का झाले?